विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून १५ मेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेच्या अटी व शर्ती अशा आहेत.
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व माहीती शासनाच्या http://maharashtra.gov.in/Site/View AllNews या सकेंतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय समोर, श्रध्दानंद पेठ नागपूर येथे संपर्क साधावा.
