विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयात २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सामाजिक न्याय विभागाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विभागीय स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना समाजकल्याण विभागाशी संबंधित काही तक्रारी, समस्या, अडचणी असेल तर त्यांनी खाली दिलेल्या लिंकशी जोडून आपल्या तक्रारी सांगावे. सदर तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
तक्रारीकरीता लिंक : https://meet.google.com/fjw-fkhh-mzo
