विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्तीसगड (Chhattisgad) : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चार जवानही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, रविवारी सकाळी विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक सुरू झाली. परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत कारवाई करत आहेत. डीआरजी विजापूर, एसटीएफ, सी-६० चे जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.
विजापूरमध्येच, १ फेब्रुवारी २०२५ रोजी, गंगलूर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ८ नक्षलवादी ठार झाले. गेल्या महिन्यात, २०-२१ जानेवारी रोजी, छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी नक्षलवादी चालपती होता, त्याच्यावर ९० लाख रुपयांचे बक्षीस होते.
