विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र शासन अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे. अशातच महाराष्ट्रात गाड्यांच्या समस्यांकडे दुरावले असले असली तरी मात्र जुन्या गाड्यांचा प्रश्न अजून कायमच आहे. यामध्ये चालक किंवा वाहकांकडून काही चूक झाल्यास त्यांच्यावर शासन त्वरित कार्यवाही करतो. परंतु ज्या वेळेस सरकारी मालमत्तेचा अशा अवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा मात्र काय…? अशा प्रश्न येतो.
चंद्रपूर आगारातील अशा अनेक बसांची स्थिती ही गंभीर असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका चालक व वाहक त्याचप्रमाणे प्रवाशांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देऊन नवीन गाड्या प्रस्थापित करून जुन्या गाड्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रवासी त्याचबरोबर चालक वर्ग करीत आहेत.
