Latest Posts

नागपूर : वर्षभरात तब्बल ५५९ मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, नटी होण्याची स्वप्न, प्रियकराच्या आमिषाचा विश्वास, आई अभ्यासासाठी रागावली, मोबाईल हिसकावला, राग अनावर झाला या अतिशय क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन आणि शाळकरी मुली, तरुणी आणि महिलांनी घर सोडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात गेल्या वर्षभरात तब्बल ५५९ मुली, महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातून अल्पवयीन मुली-तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या नोंदीतून समोर आले आहे. दररोज तीन ते चार मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात घेतल्या जात आहे. त्यासाठी विविध कारणे जरी असली तरी अशा घटनांमुळे नवी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलगी घर सोडून निघून गेली कि पालकांची गर्दी पोलीस ठाण्यात होते. अल्पवयी मुलगी असल्यास पोलीस अपहरणाची नोंद घेऊन तपास सुरु करतात. अल्पवयीन बेपत्ता झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करुन शोधण्यासाठी पथक नियुक्त करतात. मात्र, जेव्हा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली तरुणी बेपत्ता झाल्यास पोलीस मिसींगची नोंद करुन तपास थंडबस्त्यात ठेवतता. त्यामुळे राज्यातील बेपत्ता झालेल्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत शहरातून ५५९ गुन्ह्यांची (बेपत्ता) नोंद करण्यात आली. बेपत्ता झालेल्या ५५९ पैकी ५१५ जणांचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुली-महिलांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. मुली आणि तरुणी बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असून समाजमाध्यमांवरुन ओळख आणि मैत्री झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांचा टक्का वाढला आहे. अशा प्रकरणांमध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवरुन मैत्री झाली की प्रेमसंबंधापर्यंत प्रकरण पोहचून घरातून पलायन केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शाळकरी मुलींना प्रियकर सहज जाळ्यात ओढून लग्नाचे किंवा मोठमोठी स्वप्ने दाखवून घरातून पळून जाण्यासाठी बाध्य करतात. याशिवाय कौटुंबिक भांडणे, विविध कारणांसाठी मुलांना रागावणे, मनासारखे न घडणे तसेच काही वेगळे करण्याच्या नादात घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

हुडकेश्वरमधून सर्वाधिक बेपत्ता –
हुडकेश्वर ठाण्यांतर्गत बेपत्ता होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या (२४७) आहे. एमआयडीसी- २१२, यशोधरानगर- २०९, अजनी -२१२ आणि कळमना ठाण्यांतर्गत २०७ मुली- तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसींग स्कॉड नावाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक असते. बेपत्ताची नोंद झाली की हे पथक सक्रिय होते. राज्यभरातून किंवा परप्रांतातूनही हे पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेते.

गुन्हे शाखेने शोधले ४४ मुले –
शहरात वर्षभरात एकूण ५५९ गुन्ह्यांची नोंद झाली असून एकूण त्यापैकी ५१५ बेपत्ता मुला- मुलींचा पोलिसांनी शोध घेतला. यात १८७ मुले आणि ३७२ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १७५ मुले, ३४० मुलींना स्थानिक पोलीठ ठाण्यातील पथकाने शोधून काढले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे (एएचटीयू) ४२ गुन्ह्यांत ४४ बालकांचा शोध घेतला गेला. यात १३ मुले, ३१ मुलींचा समावेश आहे.

Latest Posts

Don't Miss