Latest Posts

बोर्ड परीक्षेतील कॉपी रोखण्याकरिता विशेष उपाययोजना सुरू : शिक्षण विभागाने घेतला निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. शिक्षण विभागाने यंदाच्या बोर्ड परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केली आहे. यावर्षी परीक्षेवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्डाची नजर एकदाही चुकणार नाही. त्यामुळे, जर तुम्ही कॉपी केली, तर तुमच्या सर्व क्रिया कॅमेरामध्ये कैद होणार आहेत.

शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाच्या परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रयत्न अधिक कठीण होणार आहेत. १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांवर थेट कॅमेराची नजर असणार आहे.

कॉपी रोखण्यासाठी घेतलेले उपाय –
– सीसीटीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह परीक्षांचे संपूर्ण फुटेज निकालापर्यंत जतन केले जाईल.
– विद्यार्थी बैठक व्यवस्थेत बदल करणार असतील, तर त्यावर त्वरित कारवाई केली जाईल.
– पर्यवेक्षकांना एकाच ठिकाणी उभे न राहता, फिरत राहून परीक्षेचा देखरेख करावा लागेल.
– शिक्षण विभाग नियंत्रण कक्ष स्थापन करणार आहे.

Latest Posts

Don't Miss