Latest Posts

बल्लारपूरात रात्रीच्या सुमारास चार तरुणांकडून बँक कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : स्टेट बँक ऑफ इंडिया चंद्रपूर शाखेत क्रेडिट कार्ड सेल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर चार अनोळखी तरुणांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद आकिब मोहम्मद बशीर शेख (वय ३१), रा. गांधी चौक, काझी मोहल्ला, राजुरा हे आपल्या मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी बल्लारपूर येथील एकदंत लॉन येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते मोटारसायकलने परत राजुराकडे निघाले असता, डॉ. हजारे हॉस्पिटलसमोर एक अनोळखी युवकाने त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या आणखी तीन तरुणांनी त्यांच्यावर कडयांनी, बुक्यांनी आणि काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर मार लागला. त्यांना काही काळ शुद्ध हरपल्याने ते खाली बसले असता, हल्लेखोरांनी त्यांच्या पाठीवरही काठीने मारहाण केली. हल्ल्यानंतर फिर्यादी पळून जाऊन जवळील गल्लीत लपले व मित्राला फोन करून मदत मागितली.

यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार नोंदवली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.मारहाण करणारे चारही तरुण अंदाजे २५ ते २७ वयोगटातील असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

Latest Posts

Don't Miss